KOLHAPUR
23 जुलै ७२ ला वर्धापनदिन
घाटगे पाटील इंडस्ट्रीज उचगाव कोल्हापूर येथे कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ करार संपन्न
कोल्हापूर जिल्हा इंजिनिअरिंग मजदूर संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या घाटगे पाटील इंडस्ट्रीज उचगाव येथील कायम कर्मचाऱ्यांचा सन २०२५ ते सन २०२९ अखेर म्हणजेच दि. १ जुलै २०२५ ते ३१ डिसेंबर २०२९ अखेर खेळीमेळीच्या वातावरणात संम्पन्न झाला. गेली सहा महिने चाललेल्या वाटाघाटीस आज एक चांगले मुर्तस्वरुप प्राप्त झाले.
करारातील ठळक बाबी
१. हा वेतनवाढ करार रू. ६५७०/- प्रती माह दोन टप्प्यात अवलंबला जाईल. पहिला टप्पा दि. १ जुलै २०२५ ते ३० जून २०२७ अखेर प्रतिमाह रू. ३८००/- इतकी वाढ तर १ ऑगस्ट २०२७ ते ३१ डिसेंबर २०२९ अखेर प्रतिमाह रु. ६५७०/- इतकी राहिल.
२. दि. १ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२६ अखेरचा रु. ३८००/- ने एकूण १३ महिन्याची फरकाची रक्कम दोन टप्प्यात देण्यात येणार. पहिल्या सात महिन्याचा फरक सप्टेंबर २०२६ च्या वेतनात मिळेल व राहिलेल्या सहा महिन्याचा फरक फेब्रुवारी २०२७ च्या वेतनात मिळेल.
३. निवृत्ती वेतनाचे वय ५८ वरून ६० हि कामगाराच्या वर्तणुकीवर व कामावर वाढ करण्याचे आश्वासन दिले.
४. कामगारांची शैक्षणिक पात्रता, कामातील प्रामाणिकपणा व वर्तनुक ह्यावर करण्यात येणार.
त्याप्रसंगी कंपनीचे संचालक मा. श्री. आदित्य किरण पाटील , मुख्य व्यवस्थापक मा. श्री. राव साहेब, कामगार अधिकारी श्री. सचिन भोसले, श्री. विनायक भारती, भारतीय मजदूर संघ कोल्हापूर जिल्हा माजी अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा इंजिनिअरिंग मजदूर संघ अध्यक्ष श्री. एस. एन. पाटील, जेष्ठ पदाधिकारी श्री. मुकुंद जोशी, जिल्हा अध्यक्ष श्री. रविंद्र एडके, जिल्हा सचिव श्री प्रविण जाधव, जिल्हा उपाध्यक्ष श्री. तेजेस मडिवाल , श्री. महाडिक, श्री. उत्तम कांबळे व पदाधिकारी वर्ग उपस्थित होता. करारावर उभय दोन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या सह्या झाल्यावर कंपनीच्या गेटवर भव्य द्वारसभा घेण्यात आली. त्यावेळी श्री. तेजेस मडिवाल व श्री एस. एन. पाटील ह्यांनी उपस्थित कामगार वर्गाला करारातील महत्त्वाचे मुद्दे सांगितले. फटाके वाजवून व गुलालाची उधळण करून कामगार वर्गाने आनंदोत्सव साजरा केला.
कोल्हापूर जिल्हा इंजिनिअरिंग मजदूर संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या घाटगे पाटील इंडस्ट्रीज उचगाव येथील कायम कर्मचाऱ्यांचा सन २०२५ ते सन २०२९ अखेर म्हणजेच दि. १ जुलै २०२५ ते ३१ डिसेंबर २०२९ अखेर खेळीमेळीच्या वातावरणात संम्पन्न झाला. गेली सहा महिने चाललेल्या वाटाघाटीस आज एक चांगले मुर्तस्वरुप प्राप्त झाले.
करारातील ठळक बाबी
१. हा वेतनवाढ करार रू. ६५७०/- प्रती माह दोन टप्प्यात अवलंबला जाईल. पहिला टप्पा दि. १ जुलै २०२५ ते ३० जून २०२७ अखेर प्रतिमाह रू. ३८००/- इतकी वाढ तर १ ऑगस्ट २०२७ ते ३१ डिसेंबर २०२९ अखेर प्रतिमाह रु. ६५७०/- इतकी राहिल.
२. दि. १ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२६ अखेरचा रु. ३८००/- ने एकूण १३ महिन्याची फरकाची रक्कम दोन टप्प्यात देण्यात येणार. पहिल्या सात महिन्याचा फरक सप्टेंबर २०२६ च्या वेतनात मिळेल व राहिलेल्या सहा महिन्याचा फरक फेब्रुवारी २०२७ च्या वेतनात मिळेल.
३. निवृत्ती वेतनाचे वय ५८ वरून ६० हि कामगाराच्या वर्तणुकीवर व कामावर वाढ करण्याचे आश्वासन दिले.
४. कामगारांची शैक्षणिक पात्रता, कामातील प्रामाणिकपणा व वर्तनुक ह्यावर करण्यात येणार.
त्याप्रसंगी कंपनीचे संचालक मा. श्री. आदित्य किरण पाटील , मुख्य व्यवस्थापक मा. श्री. राव साहेब, कामगार अधिकारी श्री. सचिन भोसले, श्री. विनायक भारती, भारतीय मजदूर संघ कोल्हापूर जिल्हा माजी अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा इंजिनिअरिंग मजदूर संघ अध्यक्ष श्री. एस. एन. पाटील, जेष्ठ पदाधिकारी श्री. मुकुंद जोशी, जिल्हा अध्यक्ष श्री. रविंद्र एडके, जिल्हा सचिव श्री प्रविण जाधव, जिल्हा उपाध्यक्ष श्री. तेजेस मडिवाल , श्री. महाडिक, श्री. उत्तम कांबळे व पदाधिकारी वर्ग उपस्थित होता. करारावर उभय दोन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या सह्या झाल्यावर कंपनीच्या गेटवर भव्य द्वारसभा घेण्यात आली. त्यावेळी श्री. तेजेस मडिवाल व श्री एस. एन. पाटील ह्यांनी उपस्थित कामगार वर्गाला करारातील महत्त्वाचे मुद्दे सांगितले. फटाके वाजवून व गुलालाची उधळण करून कामगार वर्गाने आनंदोत्सव साजरा केला.